शेतकऱ्यांनी घेतली कारली लागवड व विक्री व्यवस्था बद्दल संपूर्ण माहिती

श्री. अमृतजी मदनकर, वसंतराव नाईक उद्यान पंडित पुरस्कार शेतकरी, खोलमारा तथा सरपंच, खोलमारा यांचे शेतावर शेतकरी शास्त्रज्ञ मंच (Farmer Scientist Forum) समितीची सभा सकाळी ११.30 घेण्यात आली.

सभेला मा. ताराचंद नामदेव लंजे, अध्यक्ष, मा. डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र , साकोली सचिव, श्री. अमृतजी मदनकर, वसंतराव नाईक उद्यान पंडित पुरस्कार शेतकरी, खोलमारा तथा सरपंच, खोलमारा तसेच जिल्ह्यातील प्रगतीशील/अप्रगशील शेतकरी प्रतिनिधी व महिला शेतकरी प्रतिनिधी तसेच कृषी विज्ञान केंद्र साकोलीचे अधिकारी व जिल्हास्तरीय कृषि तथा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शेतकरी शास्त्रज्ञ मंच समिती मध्ये श्री. अमृत मदनकर, वसंतराव नाईक उद्यान पंडित  पुरस्कार, खोलमारा यांनी कारली पिक  शेती मधील स्वताची वाटचाल व अनुभव कथन केले. यामध्ये त्यांनी सांगितले अर्ध्या एकर कारली पिकामधून २.५० ते ३.०० लाख रुपये मिळतात यामध्ये त्यांनी प्लास्टिक मल्चिंग वर कारली लागवड कशी करायची, काय काळजी घ्यावी तसेच बाजाराचा अभ्यास करून भाजीपाला पिकांची लागवड करावी, क्रॉप कवर हि साधी कारली लागवड करिता वापरावी तसेच टनेल हि गादीवाफ्यावरील मिरची लागवडीकरिता वापरावी असे सांगितले. यासोबतच  विक्री व्यवस्था याबाबतीत स्वताचे अनुभव सांगून समितीमधील सर्व सदस्यांनी उपलब्ध जागेमधील थोड्या क्षेत्रामध्ये भाजीपाला शेती करावी  असे आवाहन केले. खोलमारा गावाची ओळख आता कारली पिकाचे गाव म्हणून होत आहे असे सांगितले. यामध्ये त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन समाधान केले.

डॉ. प्रशांत उंबरकर, विषय विशेषज्ञ, पिक संरक्षण, कृ वि के, साकोली यांनी भाजीपाला शेती बाबत मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी, भाजीपाला लागवड, अंतर, कीड व रोग व्यवस्थापन या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी जैविक पद्दतींचा अवलंब करावा असे सांगून ट्रायकोकार्ड वापर, ट्रायकोडर्मा वापर, मेटारायझीयम, विघटक, बिव्हेरिया बासियाना, व्हर्तीसीलीयम, अझोटोब्याक्तर, गांढूळपाणी , दशपर्णी अर्क, फळमाशी व्यव्स्थापना करिता ट्रपचा वापर, चिकट सापळे या बाबतीत वापर व महत्व  सांगीतले.

मा. डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृविके, साकोली तथा सचिव, शेतकरी शास्त्रज्ञ मंच समिती यांनी उपस्थित सर्व सदस्यांना पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व बाबत माहिती दिली तसेच या वर्षी आपण तृणधान्य वर्ष साजरा करीत असून शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी व इतर तृणधान्य पिकांची लागवड करावी, सोबतच पंदेकृवी अंतर्गत उत्पादित जैविक खते, बुरसीनासके, किडनासके बाबत सविस्तर माहिती दिली, जमीन  आरोग्य व्यवस्थापन बाबत माहिती दिली तसेच सर्वांनी पौष्टिक तृणधान्य ची लागवड करावी, असे आवाहन केले तसेच जमिनिमधला सेंद्रिय कर्ब कमी असून तो वाढविण्याकरिता माती परीक्षण करून, धेंचा व सोनबोरू ची लागवड व सेंद्रिय निविष्ठा बाबत माहिती दिली.  

सभेचे अध्यक्ष मा. ताराचंद नामदेव लंजे, पिंडकेपार, यांनी स्वताच्या १२ एकर उस पिक शेती बद्दल मनोगत व्यक्त केले, त्यामध्ये त्यांनी सांगितले कि शेती मध्ये व्यवस्थापन फार महत्वाचे असून, आपण आपल्या शेतीचे व्यवस्थापण कसे करतो हे आपल्यावर अवलंबून आहे, विविध कृषि प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण माहिती घेऊन, शेती पद्धतीमध्ये बदल करू सकतो, शेतकऱ्यांनी जैविक खतांचा वापर करावा असे आवाहन केले.    

यानंतर श्री. अमृत मदनकर, वसंतराव नाईक उद्यान पंडित  पुरस्कार, खोलमारा यांचे शेतावरील कारली लागवड ला भेट देऊन माहिती घेण्यात आली. यानंतर उपस्थित सदस्यांचे आभार मानून मा. अध्यक्ष, यांच्या परवानगीने सभेची समाप्ती करण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन श्री. प्रशांत उंबरकर  तर आभार प्रदर्शन श्री. योगेश महल्ले यांनी केले.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *