शेतकऱ्यांनी घेतली बियाणे साठवणूक मधील किडींचे व्यवस्थापनाविषयी माहिती  

कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांच्या वतीने “बियाणे साठवणूक मधील किडींचे व्यवस्थापण” या विषयावर दुपारी १२.०० वाजता  शेतकरी शास्त्रज्ञ मंच (Farmer Scientist Forum) समिती ची सभा कृषि विज्ञान केंद्र, साकोली इथे आयोजित करण्यात आली होती.

सभेला मा. ताराचंद नामदेव लंजे, अध्यक्ष, शेतकरी शास्त्रज्ञ मंच, डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र , साकोली, डॉ. निनाद कोरडे, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग साकोली, अतिथी श्री, एम आर ढीमुळे, रेशीम विकास अधिकारी भंडारा, डॉ. नितीन तुरस्कर, तसेच जिल्ह्यातील प्रगतीशील/अप्रगशील शेतकरी प्रतिनिधी व महिला शेतकरी प्रतिनिधी तसेच कृषी विज्ञान केंद्र साकोलीचे अधिकारी व जिल्हास्तरीय कृषि तथा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मा. डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृविके, साकोली तथा सचिव, शेतकरी शास्त्रज्ञ मंच समिती यांनी जमीन सुपीक असेल तर रोग कमी व रोग कमी तर उत्पादन जास्त असे समीकरण आहे, जमीन सुपीकतेसाठी शेतातील तणीस, कडीकचरा व पालापाचोळा यांचा वापर करा, शेतीसोबत पशुपालन, कुक्कुटपालन सारखे शेतीपूरक व्यवसाय करणे गरजेचे आहे, रासायनिक खताचा अतोनात वापर झाल्याने जमिनीची सुपीकता कमी होत आहे, रब्बी हंगामातील पिक व्यवस्थापन, जमिन आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले व  शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व या बाबत माहिती दिली तसेच उपस्थित सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन, सर्वांनी पौष्टिक तृणधान्य ची लागवड करावी, असे आवाहन केले.  

शेतकरी शास्त्रज्ञ मंच समिती मध्ये डॉ. प्रशांत उंबरकर, विषय विशेषज्ञ, पिक संरक्षण, कृ वि के, साकोली यांनी यांनी बियाणे साठवणूक मधील किडींचे व्यवस्थापण या विषयावर सादरीकरण च्या माध्यमातून माहिती दिली. यामध्ये त्यांनी धान, गहू, चना व इतर पिकांवरील साठवणूक मधील किडींची ओळख व व्यवस्थापण या बाबतीत माहिती दिली. यामध्ये त्यांनी धान्य साठवणूक करताना कडुलिंबचा पाला चा वापर करावा असा सल्ला दिला तसेच उपस्थित सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन समाधान केले. 

श्री. योगेश महल्ले वि. वि.कृषी अभियांत्रिकी यांनी केले. यामध्ये त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने मातीचानमुना कसा घ्यावा तसेच माती परीक्षणाचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.

डॉ. निनाद कोरडे, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग साकोली यांनी पशुसंवर्धन विभागामार्फत सुरु असणाऱ्या राष्ट्रीय पशुसंवर्धन मिशन, स्मार्ट अशा अत्यंत महत्वपूर्ण शेती पूरक योजनांची माहिती दिली व  शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.

श्री. एम आर ढीमुळे रेशीम विकास अधिकारी भंडारा यांनी रेशीमशेती लागवड तंत्रज्ञान याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

श्री. ताराचंदजी लंजे, अध्यक्ष, शेतकरी शास्त्रज्ञ मंच यांनी स्वताच्या शेतावरील भाजीपाला पिक लागवड  व ऊसशेती लागवड बाबत अनुभव सांगितले तसेच शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रमातील विषय शेतकरी हिताचे असून त्यांना त्याचा फायदा होत आहे असे मनोगत व्यक्त केले. 

यानंतर उपस्थित सदस्यांचे आभार मानून मा. अध्यक्ष, यांच्या परवानगीने सभेची समाप्ती करण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन श्री. श्री. प्रमोद पर्वते, विषय विशेषज्ञ, कृषि विस्तार, कृ वि के, साकोली तर आभार प्रदर्शन श्री. योगेश महल्ले, विषय विशेषज्ञ, कृषि अभियांत्रिकी, कृ वि के, साकोली यांनी केले.      

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *