शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब  करावा : मा. श्री. सुनीलजी मेंढे, खासदार, भंडारा- गोंदिया

केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्याकरिता विविध योजना राबविण्यात येत आहेत, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्याकरिता लाभदायक आहे,  त्यांअतर्गत नुकतेच मा. प्रधानमंत्री, भारत सरकार द्वारे देशातील १२ करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किसान सन्मान निधी ची १२ वी किश्त म्हणजेच १६ हजार करोड रुपये वितरीत केले आहे तसेच प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन केलेले असून  “वन नेशन वन फर्टीलायझर” योजनेचा शुभारंभ केलेला आहे. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, शिवार फेरीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी असे प्रतिपादन मा. श्री. सुनीलजी मेंढे, खासदार, भंडारा गोंदिया यांनी केले ते कृषि विज्ञान केंद्र, साकोली व महाराष्ट्र राज्य  ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  “शेतकरी मेळावा, शिवार फेरी व चर्चासत्र” कार्यक्रमात आभासी पद्दतीने बोलत होते.  कृषि विज्ञान केंद्र, साकोली, प्रक्षेत्रावर “शिवार फेरी” चे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून  मा. श्री. सुनीलजी मेंढे, खासदार, भंडारा गोंदिया, प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. गणेश आदे, सभापती, पं.स, साकोली, मा. सौ. वनिताताई डोये, जिल्हा परिषद सदस्या, कुंभली, मा. सौ. सरीताताई करंजेकर, उपसभापती, पं.स, साकोली, मा.डॉ. उषा आर. डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, मा.डॉ. मिलिंद मेश्राम, वरिष्ठ भात पैदासकार, कृषी संशोधन केंद्र, साकोली, मा. श्री. घनश्यामजी पारधी, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, किन्ही, सौ., वृषाली देशमुख, कृषी अधिकारी, साकोली, मा. छाया कापगते, कृषी अधिकारी, साकोली, यांचेसह कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथील श्री. पी. पी. पर्वते, श्री. वाय. आर. महल्ले,  डॉ. प्रशांत उंबरकर,  डॉ. पी बी खिरारी, श्री. लयंत अनित्य आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करून करण्यात आली.

मा.डॉ. उषा आर. डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी कार्यक्रमाचे प्रास्थाविक केले, यामध्ये त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला निर्मित धानाच्या विविध कीड व रोग प्रतिकारक वाणाचा वापर शेतकरी बंधूनी  करावा जेणेकरून कीड-रोगांचा कमीत कमी प्रादुर्भाव होऊन जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येईल, येणाऱ्या रबी हंगामात कमी खर्चाचे तंत्रज्ञान/ शून्य मशागत तंत्रज्ञान अबलंब करून, उन्हाळी धानाला पर्यायी पिकांचा वापर करावा असे आवाहन केले.   

मा. श्री. घनश्यामजी पारधी, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, किन्ही यांनी स्वताचे अनुभव कथन करून तेलबिया पिकाची लागवड करावी असे सांगितले. मा. सौ. सरीताताई करंजेकर, उपसभापती, पं.स, साकोली यांनी उपस्थितांना शिवार फेरी मध्ये विविध धान पिक वाणाची माहिती घ्यावी असे सांगितले. मा. सौ. वनिताताई डोये, जिल्हा परिषद सदस्या, कुंभली यांनी उपस्थितांना रबी हंगाम पूर्वी पिक बाबत शास्त्रज्ञांनी चर्चा करावी असे सांगितले. मा. श्री. गणेश आदे, सभापती, पं.स, साकोली यांनी उपस्थितांना स्वताचे शेतीविषयक अनुभव सांगून शेतकरी हा प्रयोगशील असावा, प्रशिक्षनाच्या माध्यमातून स्वताच्या शेतीमध्ये प्रयोग करावे असे आवाहन केले.

यावेळी प्रशेत्रावर शिवार फेरी करण्यात आली यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला निर्मित विविध धानाच्या कीड व रोग प्रतिकारक वाणांची लागवड पाहणी, धान पिकाचे विविध जाती/ वाण माहिती, प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष शेतात उभा मशीनने पेरलेला आवत्या धान, विविध औजारे, आवत्या पेरणी मशीन, धानातील पेट्रोलवर चालणारे डवरण यंत्र, धान कापणी यंत्र, विविध तंत्रज्ञान, जनावरांचा पोषक चारा, शेळीच्या जाती, धान पिक लागवडीच्या विविध पद्धती याविषयी शेतकऱ्यांनी पाहणी करून माहिती घेतली. यामध्ये डॉ. प्रशांत उंबरकर, विषय विशेतज्ञ, कीटकशास्त्र कृषि विज्ञान केंद्र, साकोली, यांनी धान पिकावरील प्रमुख किडी व त्यांचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले, श्री. पी. पी. पर्वते,  विषय विशेतज्ञ, कृषी विस्तार, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी कृषि क्षेत्रात विविध मोबाईल अँप्सचा वापर याबाबत माहिती देऊन कृषि विज्ञान केंद्र, साकोली अंतर्गत असलेल्या सुविधांची माहिती दिली. श्री. वाय. आर. महल्ले, विषय विशेतज्ञ, कृषी अभियांत्रिकी पेरीव धान लागवड पद्धत बाबत सविस्तर माहिती दिली तसेच रबी पिकाकरीता विविध औजारे व यंत्रे बाबत मार्गदर्शन केले. डॉ. पी बी खिरारी, विषय विशेतज्ञ, पशुसंवर्धन यांनी रबी चारा  पिक लागवड तंत्रज्ञान बाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. श्री. लयंत अनित्य, विषय विशेतज्ञ, हवामानशास्त्र, यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जिल्हा कृषी हवामान संदेश- गरज व फायदे  या विषयावर मार्गदर्शन केले.  

            सदर कार्यक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला निर्मित विविध प्रकाशने, कृषिसंवादिनी विक्री करिता उपलब्ध करून देण्यात आलेले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद पर्वते, विषय विशेषज्ञ, कृषि विस्तार यांनी केले तर आभार श्री. वाय. आर. महल्ले, विषय विशेतज्ञ, कृषी अभियांत्रिकी, यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता  श्री. कपिल गायकवाड, कार्यक्रम सहायक, संगणक, श्री. गणेश गुसिंगे, कु. आशा इडोळे, कु. प्रियंका जांभोळे, जागेश संग्रामे, जागेश्वर कापगते यांचे सहकार्य लाभले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *